Saturday, March 26, 2011

सगळ्यांना सुचतात कविता

सगळ्यांना सुचतात कविता

एकमेकाचा वाचून कविता

तसे(प्रत्येक) एकट्यानेच लिहतो

आपण आपली कविता

.

कुणाला वाटते कधी

रात्र काळी होवून उठते

अश्या रात्री कुणाच्या मनी

एक एक चांदणी फुटते

.

वेडेपणाची सारी वेडे

इथ साऱ्यांना वेडवतात

मन होते दर्यासागर

हे मोकाट ताफे चालवतात

.

खवळलेला समुद्र तर

मन कधी यांचे शांत

गर्तेपेक्षा खोलच खोल

यांचा मनाचा नसतो अंत

.

बारा ही महिने असतात

ऋतू यांचे फुललेले

दिवसा खेळ चालतातच

रात्री ही झोपाळे झूललेले

.

वसंतात पानगळ यांची

वैशाखात पालवी नवी

म्हणूनची कि काय म्हणतात बुवा....

"जे न देखे रवी ते ते देखे कवी"



मनोज.....१९/२/२०११

No comments:

Post a Comment