Wednesday, March 30, 2011

दळभद्री विचार

दळभद्री विचार

मुंबईतला सागरी पूल तर

दोन्ही कॉंग्रेसला जोडू लागला.

रस्त्यावरच्या भिकार्‍यांना मात्र

नवाच प्रश्न पडू लागला.



नामकरणाच्या राजकारणाशिवाय

राजकारण्यांना जगता येणार नाही !

भिकार्‍यांचे दु:ख हे की,

त्या पुलाखाली बसून

भिक मागता येणार नाही !!



-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

Post a Comment