अरे चोरांनो.......
चोरली कुणाची कविता तर
निदान चोरी खपली पाहिजे.
कविता चोरावी अशी की,
ती आपल्याला झेपली पाहिजे.
चोरी ती चोरीच
कधी ना कधी फुटली जाते.
उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट
वाचकांनाही पटली जाते.
इतर चोर्यांप्रमाणेच
कवितेचीही चोरी पचत नाही !
कारण काळीज हालल्याशिवाय
कविता कधी सुचत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment