Friday, March 25, 2011

संकटांना बुडवुन फुलायचं असतं.

फुलायचं असतं

गुलाब सांगतो,

येता जाता रडायचं नसतं,

काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,

अंधाराला घाबरायचं नसतं,

काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,

रुसुन रुसुन रहायचं नसतं,

हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,

सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,

गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,

स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,

सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,

संकटात चिखलात बुडायचं नसतं,

संकटांना बुडवुन फुलायचं असतं.........

No comments:

Post a Comment